Thursday, 1 September 2016

नशीब..

नशिब- कुणाला हसवतं, कुणाला फसवतं...
कुणाला नाचवतं, कुणाला खचवतं..

कधी डोळ्यात पाणी येईपर्यंत हसवणारे क्षण देतं..
तर कधी डोळ्यातलं पाणी संपत नाही इतकं रडवतं...

कितीही कणखर राहिलात तरी त्याचा इंगा ते दाखवतंच.. तुमची हुषारी, मेहनत, लगन सगळं मग त्याच्यापुढे फिकं पडतं...

तुमचं उद्देश्य, आशा-आकांक्षा, त्याच्यासाठी क्षुल्लक असतं..
नशिबात नसेलच तर क्षणात सगळ्याचा चुथडा करुन टाकतं.

कुणाकुणाचं खूपच छान असतं, पात्रता नसतानाही खूप काही देत असतं,
आपण फक्त पहायचं असतं, कारण आपल्या हाती काहीच नसतं...

Wednesday, 26 March 2014

मातृत्व- एक अद्भुत अनुभूती

मातृत्व- एक अद्भुत अनुभूती:
येणाऱ्या बाळाची चाहूल लागताच सगळं जग कसं सुंदर वाटू लागतं.. आपल्या शरीरात आणखीन एक जिवंत शरीर वाढतंय ह्याची अनुभूती फक्त ती आईच घेऊ शकते जी एका बाळाला जन्म देते.
त्या जीवाची वाढ होणे, त्याचे सर्व अवयव व्यवस्थित विकसित होणे, इतकेच नवे तर त्याला बुद्धी, शक्ती, प्रज्ञा, तेज, वाचा, मन आणि सुदृढ काया प्राप्त होणे हा केवळ एक दैवी चमत्कारच आहे. नीट विचार केला तर केवळ ९ महिन्यांमध्ये परमेश्वर आपल्याला आपल्यासारखाच आणि आपलाच एक अंश असलेला मानव प्राप्त करून आपल्याला जणू एक अमुल्य भेटच देतो. हि कदाचित अशी एकमेव गोष्ट असेल जी शास्त्रज्ञ किंवा जगातला सर्वात बुद्धिमान मानव किंवा यंत्र कधीच निर्माण करू शकत नाही. देवाचे अस्तित्व न मानणारे ह्या क्रियेला फक्त 'निसर्ग' म्हणून संबोधत असतील इतकंच!
त्या जीवाची दिवसागणिक वाढ बघितली तर आपल्या लक्षात येईल कि हा चमत्कार केवळ परमेश्वरच करू शकतो.. केवळ अवयव प्रदान करणे इतकेच हे कार्य नसून कितीतरी सूक्ष्म बाबींचा विचार त्याला करावा लागतो..
डोळ्यांना दृष्टी, रंग ज्ञान, अंतर समजण्याची क्षमता प्राप्त करून देणे, जिभेला चव घेण्याची, बोलण्याची क्षमता असणे, हाता-पायांना शक्ती, योग्य हालचाल असणे, मेंदूमध्ये बुद्धी आणि स्मरणशक्ती असणे, नाकामध्ये श्वसन आणि वास घेण्याची क्षमता असणे, आणि हृदयामधली 'धडधड' अविरत चालू ठेवणे.. हे सर्व केवळ आणि केवळ परमेश्वरी चमत्कार आणि त्याची कृपाच आहेत! पण तोच श्वास जेंव्हा त्याला थांबवायचा असतो, तेंव्हा तज्ञ डॉक्टर्स सुद्धा काही करू शकत नाहीत.
हा सर्व विचार केला तर केवळ ९ महिन्यांमध्ये एक जिवंत मानवी शरीर निर्माण करणे ही मानवाला मिळालेली एक परमेश्वरी देणगीच आहे ह्यावर ठाम विश्वास बसतो!
'आई' अशी हाक मारणारं आपलं स्वतःचं एक बाळ असावं, अशी प्रत्येक स्त्री ची आकांक्षा असतेच.; आणि खरंतर स्त्री ला मातृत्वा नंतरच एकप्रकारचे समाधान आणि शांतता प्राप्त होते असे म्हणतात.प्रसुति कशीही झालेली असो, आपल्या बाळाच्या चिमुकल्या हातांच्या स्पर्शाने, त्याच्या त्या निरागस चेहेऱ्याकडे, इवल्याश्या पावलांकडे पाहूनच ती आई सर्व प्रसूती वेदना विसरून जाते. . तिला पान्हा फुटतो.
लहान मुलं परमेश्वराचा अंश असतात ह्यात काही शंका नाही.. त्यांचं वाढणं, हळूहळू रांगायला, चालायला, बोलायला शिकणं हे बघताना प्रत्येक आई ला मातृत्वाचा अभिमानंच वाटतो. आणि तेंव्हा प्रत्येक आई ला आपलं बाळ लहानच राहावं असाही वाटतं..
ज्यांना परमेश्वर कृपेने हे भाग्य लाभलं, त्यांनी आपापली संस्कृती जपून त्यांच्या मुलांवर उत्तम संस्कार करून पालकत्वाचे कर्तव्य पार पाडावे आणि पालकत्वाची संधी दिल्याबद्दल परमेश्वराचे आभार मानावेत. ज्यांना दुर्भाग्याने/ दुर्दैवाने हे सुख प्राप्त झाले नाही त्यांनी अनाथ मुल दत्तक घेऊन समाजाचे ऋण फेडावेत आणि पालकत्वाचा आनंद उपभोगावा.
कारण शेवटी जन्म पेक्षाही जास्त महत्व कशाला असेल तर संस्कारांनाच!




Monday, 11 March 2013

सून आणि मुलगी

प्रत्येकाची कुटुंबे वेगळी असतात.. कोणा आई वडिलांना फक्त मुलेच असतात, कोणाला फक्त मुलीच असतात.. तर कोणाकोणाला मुलगा आणि मुलगी दोनही! मला वाटतं, मुलगा आणि मुलगी दोनही असणारे समतोल विचार करू शकतात. आणि करत नसतील तर त्यांनी तो करावाच!
बऱ्याचदा आपल्यासारख्या कुटुंबांमध्ये जिथे मुलगा आणि मुलगी दोनही असतात, तिथे मुलीचे आधी लग्न लावले जाते किंवा जात असे.. आई वडील म्हणतात, एकदा का हिचे लग्न लाऊन दिले की माझी जबाबदारी संपली. पण वास्तविक जीवनात, बरेच आई-वडील लग्नानंतरही मुलीच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करताना किंवा क्षुल्लक गोष्टींची विनाकारण काळजी करताना दिसतात. बऱ्याचश्या मुलीही आपल्या घरातल्या वैयक्तिक गोष्टी उटसूट आपल्या माहेरी सांगत बसतात. मुलगी लग्न होऊन तिच्या सासरी गेली, स्थिर झाली की खरंतर आई-वडिलांची काळजी मिटते पण काहींची ती विनाकारण वाढते.. त्या काळजीत, काहींना हे लक्षातही येत नाही की त्यांचे चिरंजीवही मोठे झाले आहेत, पण त्यांच्या आपणहून लक्षात जरी नाही आले, तरी जेंव्हा घरात त्याच्या एखाद्या खास मैत्रिणीची वर्दळ वाढते तेंव्हा मात्र त्यांना ते समजून घ्यावेच लागते आणि त्याच्याही लग्नाचा लवकरच बार उडतो. 
                            झाले, घरामध्ये 'सुनबाई' आल्या.. ह्या क्षणी बऱ्याच सासवा हे विसरतात कि आपणही असेच एकदा ह्या अनोळखी घरात आलो होतो आणि इतके वर्ष ह्या घरामध्ये जरी आपले वर्चस्व असले तरी आता आपण ते हळूहळू तिला सोपवायला पहिजे.. आपला संसार झाला; आता आपण निवृत्त झाले पाहिजे.. बऱ्याचदा ह्याच्या उलट होते! सून घरात आली म्हणल्यावर सासूला उगाचच असुरक्षित वाटू लागते.. आणि ती पहिल्यापेक्षा जरा जास्तच जोमाने काम करू लागते.. सुरुवातीला जरी सगळे सुरळीत वाटले तरी बऱ्याचदा सासवा उगाचच मुलगी आणि सून ह्यांच्यात तुलना करू लागतात. तेंव्हा त्यांच्या हे लक्षात येणे गरजेचे असते की मुलगी आणि सून म्हणून नव्हे तर दोन भिन्न व्यक्ती म्हणून त्यांच्या सवई, संस्कार, स्वभाव, आवडी-निवडी, त्यांच्यातले कलागुण, शिक्षण, सौंदर्य, शरीरयष्टी, त्यांची ध्येयं, त्यांचे विचार आणि त्यांचे वैयक्तिक जीवनातील अनुभव हे वेगळेच असणार. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे कोणीच कोणाची कोणाशी तुलना करू नये. जी गोष्ट आपल्या स्वतः ला आपल्या बाबतीत झालेली आवडणार नाही ती आपण दुसऱ्याच्या बाबतीतही कधी करू नये.
                          प्रत्येक नात्यात संवाद आणि सुसंवाद खूप महत्वाचा असतो. एकमेकांना वेळ देणे, समजून घेणे हे दोनही बाजूंनी झाले पाहिजे नाहीतर नात्यातला ओलावा टिकणार नाही. प्रत्येक व्यक्तीला तिने केलेल्या चांगल्या कामाबद्दल कोणीतरी २ शब्द कौतुक करावे असे वाटते. "व्वा, फारच छान!" असे शब्द ऐकून त्या व्यक्तीला आणखी प्रेरणा मिळते पण त्या उलट जर घरातलेच कौतुक करण्यात कमी पडले तर त्या घराला कधीच घरपण येणार नाही. उदाहरणार्थ, सासू-सुनांपैकी कोणी छान भाजी केली तर लगेच "व्वा, छान झालीये हं भाजी" म्हणल्याने करणाऱ्याला बरे वाटते आणि आपल्या कष्टांचे चीज झाले असे वाटते.. किंवा सूनबाईन्नी कधी दारात छानशी रांगोळी काढली तर "छान आलीये हं रांगोळी" हे चार शब्द बोलायला दोन सेकंद पण लागत नाहीत पण तेच नाही म्हणले गेले तर कदाचित तिच्या मनात कायमस्वरूपी आढी निर्माण होऊ शकते. तिच्या कोणत्याच चांगल्या गोष्टींचे घरात कौतुकच होत नाही असे तिला वाटू शकते.
तिच्याच जागी जर आपल्या मुलीने एखादे चित्र, काहीतरी कलात्मक गोष्ट किंवा तीच रांगोळी काढली असती तर आपण कौतुकाने आणखीन चार लोकांना सांगितलेही असते, मग तीच गोष्ट सहजरीत्या तिच्याही बाबतीत व्हायला हवी. कौतुकाचे दोन शब्द, वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा, एखाद्या कर्तृत्वा बद्दल, शैक्षणिक किंवा व्यावसायिक यशाबद्दल देण्यात येणारी छोटीशी भेट आणि शुभेच्छा,  ह्या छोट्या दिसणाऱ्या गोष्टी खूप मोठे काम करून जातात.. आपण हे करत आहोत नं हे प्रत्येक कुटुंबीयाने पहिले पहिजे.
                          परवाच मी एका मराठी मालिकेमध्ये ऐकले, 'सून कधी मुलगी होऊ शकत नाही आणि सासू कधी आई होऊ शकत नाही'. हे खरे का खोटे मी सांगू शकत नाही पण सुनेनी सासूशी 'सासू' म्हणून आणि सासूने सुनेशी 'सून' म्हणून वागण्यापेक्षा एक माणूस म्हणून वागले तरी गोष्टी खूप सोप्या होतील..
येणारी नवीन मुलगी नवीन अनुभव घेऊन येते, तेंव्हा एखादी गोष्ट आम्ही 'अशीच' करतो हा ठेका चालवण्यापेक्षा नाविन्य स्वीकारायला काय हरकत आहे? "Change is the constant thing in the world"- बदल हीच कायमस्वरूपी राहणारी गोष्ट आहे त्यामुळे तो स्वीकारणेच सर्वांच्या हिताचे असते. कारण आज ना उद्या, तुमची इच्छा असो वा नसो तुमचे कुटुंब पुढे तीच चालवणार आहे!
येणाऱ्या सुनेलाही काही गोष्टींची जाणीव व्हायला वेळ लागू शकतो.. प्रत्येक गोष्टीला, नात्याला स्थिर व्हायला एक वेळ द्यावा लागतो.. जसे नवरा-बायको लग्नाच्या आधी एकमेकांच्या अपेक्षा discuss करतात तसंच लग्नानंतर घरातल्या सर्वांनीच एखाद्या सुट्टीच्या दिवशी अशी चर्चा करायला काय हरकत आहे? काहींना बोलल्याशिवाय काही गोष्टी कळत नसतील, तर संवादासारखे माध्यम नाही. पण त्यात कुठेही एकमेकांची उणी-दुणी न काढता आपले मत व्यक्त करणे एवढाच उद्देश असू द्यावा, बळजबरी नको. आपल्या मते एखादा चुकतोय ह्याचा अर्थ तो चुकीचाच आहे हे ठरवायचा हक्क आपल्याला नाही. आपण गोड भाषेत सुचविण्याचे काम करू शकतो त्याउपर प्रत्येकालाच व्यक्ती-स्वातंत्र्य आहे ह्याची जाणीव ठेवावी.

Generation gap हाही भाग खूप महत्वाचा आहे आणि तो राहणारच. मतभिन्नता ही वडील-मुलगा, आई-मुलगी ह्यांच्यातही असू शकते तर सासू-सुनांमध्ये का नाही असू शकत. लग्नापर्यंत कितीही मतभिन्नता असेल तरीही जसे आपण आई-वडिलांपासून वेगळे होत नाही तसे बायको आल्यानंतर त्यांचे एकमेकांशी पटत नाही म्हणून 'वेगळे होणे' हा पर्यायाच असू शकत नाही. केवळ आणि केवळ संवाद हाच ह्यावरचा उपाय आहे. आजकाल एकत्र कुटुंबे राहिलीच किती आहेत? पण ज्यांची आहेत त्यांनी तरी ती खरोखरच एकत्र कशी राहतील ह्यावर भर द्यावा.





Friday, 8 June 2012

'जाणं'..


काही लोक आपल्या आयुष्यात येतात.. पण क्षणभरासाठीच!! आणि अचानक निघूनही जातात.. न विचारता.. कुठेतरी किंवा कायमचेच! आपण मात्र उगीच जीव लाऊन बसतो! तसं तर सगळ्यांनाच माहित असतं, आयुष्य क्षणभंगुर असतं ते ! लोक येतात, जातात.. त्यांच्या आठवणी कधी पुसट तरी कधी ठळक होत असतात.. ज्यांना आठवतही नसतो आपण, त्यांच्या साठी आपले डोळे मात्र वाहात राहतात..
त्या रस्त्यावर.. त्या फोटों'मध्ये' आणि 'मागे' त्या सर्व आठवणी घुटमळत राहतात.. अचानक कधीतरी ते रस्ते आपल्या पायाखालून जात असतात आणि ते फोटो आणि त्यांच्या बरोबर ओघानं येणाऱ्या त्यांच्या त्या आठवणी खाडकन डोळ्यासमोर येतात.. आणि तेंव्हाचा एक अन एक क्षण आत्ता जगू लागतात..
ती लोकं..  लोकं नव्हे, एकेकाळचे आपले जिवलग न सांगताच.... .....!
काही जवळ असूनही आता आपले नसतात, काही जवळ असतात, आपलेही असतात पण जिवलग नसतात..  तर काही जवळ असतात पण आपलेही नसतात आणि जिवलगही !!
कधीतरी जुन्या mobile  मधल्या images, messages अचानक उघडल्यावर असं होतं..!! कोणाबरोबर काही क्षण, काही दिवस तर कोणाबरोबर काही महिने, वर्षे घालवलेली असतात असे ते आपले, परके सगळेच असतात त्यात.. कोणाबरोबर तर आयुष्य आणि त्याची स्वप्ने पाहिलेली असतात, कोणाबरोबर आयुष्याचा अर्थ कळलेला असतो! ..पण 'जाणं' कोणीच थांबवू शकत नाही.. थांबवूही नाही.. कारण जाणारे जातातच आणि येणारेही येतच राहतात.. पुन्हा जाण्यासाठी किंवा थांबण्यासाठी..


Tuesday, 20 March 2012

Because of you..


Dedicated to 'the one' who has been my Mentor.. my Idol who changed my life... !




Because of you I could think out of the box..
Because of you I could learn how to talk and walk..


Because of you I could understand my inner potential & qualities..
also how to comply with duties and responsibilities..

It is you, who always motivated me, guided me and taught me so many things through your talks and through your silence too..
Because of you, I could understand, life has brighter side too ..

Because of you I could learn how to give and forgive..
also, how to accept and digest..!

Because of you I could understand-
'how to face failed innings'
and it's again you, who taught-
'how to take success and winnings'!!

Because of you I could learn how to read mind..
and also, how to be sooo kind..

When you advise, you are like my father..
When you care, you are like my mother..
When you share, you are my friend..
But when you don't do this, it's just 'the end'..

It's you who drew my life..
There are very few, who are alike..
__________________________________________________________________________________



Saturday, 17 March 2012

कधी कधी असं वाटतं..

कधी कधी असं वाटतं गेलेला वेळ परत मागावा देवाकडे .. मागे जाऊन change  कराव्याश्या वाटतात बिघडलेल्या गोष्टी.. पण आपण यातलं कधीच काहीच करू शकत नाही ..
अशा वेळी गर्दीत जाऊन एकट्यानं एक फेरफटका मारावा.. पण सगळ्यांमध्ये असतानाही जेंव्हा एकटं वाटू लागतं तेंव्हा समजावं की 'तो'च आपलं 'सगळं' काही झाला आहे..
अश्या वेळी फक्त तोच हवा असतो, एकांतात बसून त्याचा हात हातात घ्यायचा असतो; त्यालाही असंच वाटावं असही वाटतं.. पण तो भेटणार नसेल तर मात्र कुणालाच भेटू नाही असं वाटतं.. मग आयुष्य खूप कांटाळवाणं वाटू लागतं.. त्या वेलीवरची फुलेही कोमेजलेली वाटू लागतात.. माणसं म्हणजे 'गर्दी' वाटू लागते.. भूक लागली असूनही, नाही लागलीये असं वाटतं.. काही सुद्धा नको वाटतं.. आपण कोणाशी आणि कोणी आपल्याशी बोलू नाही असं वाटतं..  धो-धो पाउस पडावा असंही वाटतं.. एकटं कुठेतरी जाऊन ढसाढसा रडावसं वाटतं.. रडतोही आपण!
पण इतक्यात त्याचा phone येतो.. 'भेटायचं' म्हणतो.. आणि मग..
राहिलेलं रडणं त्याच्या मिठीत होतं.. आणि तेंव्हा कुठे मन शांत होतं.. आणि अचानक जगाचं रुपच पालटतं.. कोमेजलेली फुलेही मग उमललेली वाटतात.. गर्दीमध्ये आपल्या अस्तित्वाची जाणीव होऊ लागते.. आणि मग सगळंच सुंदर वाटू लागतं.. खूप..
'खूप जास्त'!

Wednesday, 22 February 2012

कटू सत्य!



Reality 'face' करणं, 'FACT accept' करणं हे आता खूप अंगवळणी पडलंय नाही का आपल्या?
रोज नवीन घटना आईकायला मिळतात, आणि आपला काय संबंध म्हणून चर्चा करून, चिघळून चोथा करून रीतसरपणे विसार्ल्याही जातात..
काही facts :
एकेकाळी mobile हा फक्त श्रीमंत लोकांकडेच असू शकतो असा वाटत असतानाच ७-८ वर्षात प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातातही तो दिसू लागला. वस्तू स्वस्त झाल्या का लोक श्रीमंत?
एकेकाळी आजोबा आणि बाबांच्या तोंडून 'month -end' हा शब्द दर महिन्याला आईकू यायचा आणि त्यामुळे अडीच रुपयांचं आईसक्रीम सुद्धा २३-२४ तारखेनंतर मागणं आपोआप बंद व्हायचं..!
पण आता मुलांचा पॉकेट मनी च एखाद्या गरीब माणसाच्या पगार इतका झालाय. दहावी-अकरावी च्या मुलांच्या हातात क्रोनोग्राफ ची घड्याळे टिकटिकताना दिसतात.. डॉक्टर , दुकानदारही तुमच्या गळ्यातला IT कंपनी चा पट्टा पाहून बिलं फाडताना दिसतात..
मला आठवतंय, माझ्या जॉबची पहिली २ वर्षे मी सायकल वरून जायचे, पण आता १६ वर्षे पूर्ण झाली की आई वडील मुलांना परीक्षेत चांगले मार्क पडण्याच्या बदल्यात Activa Karizma ची स्वप्ने दाखवतात.. Costa Coffee , Barista , Cafe coffee day च्या outlets वर collegians ची गर्दी वाढू लागली.. आणि ८० रुपयांची coffee पिण्याइतकी तरुणाई श्रीमंत झाली..
कदाचित पूर्वीची 'साधी राहणी आणि उच्च विचारसरणी' ही म्हण हळू हळू लोप पावतेय..
एकीकडे जाणवतंय समाज प्रगत होत चाललाय, भारत 'developing Country ' झालाय.. वाडे नष्ट होऊन बिल्डींग्स उभ्या राहिल्याय्त, दर चौथ्या- पाचव्या इमारतीत कोणीतरी foreign ला चाललाय... एकत्र कुटुंबांची विभक्त कुटुंबे झाली, मुलांना आंगण, माजघर, आजीच्या गोष्टी, विटी-दांडू, पाणी तापवण्याचा बंब, पिंप, कोब्याची फरशी, सोवळं-ओवळं, तिन्हीसांज, शुभंकरोती ह्या आणि अश्या शब्दांची आठवणही नाही राहिली. कमी पैशात काटकसर करून भागावण्यातला आनंदही हरवून गेलाय.. पूर्वी दहा पंधरा भावंडांच्या गोतावळ्यात दिवसाची सांज कधी व्हायची पत्ता लागत नसेल आणि आता इन मीन दोन असूनही त्यांना एकमेकांना भेटायला वेळ होत नाही.. तेंव्हा २ खोल्यांमध्ये ७-८ जण राहायचे पण आता ४ जणांना पण privacy लागते.. पूर्वी कुठे होते 'Mother 's day , father 's day आणि valentine 's day ? प्रेम तर तेंव्हाही होतंच नं! इंग्लिश culture च्या नावाखाली मातृभाषेला विसरू लागलेयत; माझा मुलगा/ मुलगी 'मराठी मिडीयम' मध्ये जातो/ जाते हे सांगायला आता आम्हाला लाज वाटते आणि त्याचं किंवा तिचं शिक्षण बाजूला राहून आपला 'Status symbol' जास्त महत्वाचा झालाय.

fact आहे! कटू सत्य!
पण कोणीही काहीही म्हणो, तीच fact कुठेतरी तुम्ही आम्ही accept केली आहे नाही का? आणि आपलं आयुष्य दुखी करून घेतलं आहे..
आणि हेच कारण आहे पूर्वी psychiatrists , family courts नसण्याचं!! जाणवतं मग- जुनं तेच सोनं!
करूयात का मग आपण सगळेच प्रयत्न जुनं टिकवून नवीन स्वीकारण्याचा?